आज ते मित्र कामा मध्ये आहेत, पण अस वाटत की कधीतरी सर्वांनी तसच पुर्वी सारख कफ़ल्लक होऊन चालत करणजी किंवा अण्णा कडे जाव आणि पुन्हा तोच दंगा घालावा!
Total Pageviews
Friday, February 18, 2011
मैफ़िल
आज दुपारी ३ च्या सुमारास मी कामासाठी वझॆ केळ्कर कॉलेजला गेलो होतो, तिठे गेल्यावर मला नेहमी वाटायच की किती शांत असतात हे लोक. पण आज तिथल्या टपरीवर सिगारेट ऒढत असताना दोन मुल तिथे आली,पहिला मुलगा बुटका, सड्सडीत उंचीचा आणि त्याने डोळ्यात लेन्स घातल्या होत्या. दुसरा मुलगा फ़ॉर्मल घालुन चष्मा घालुन होता, पहिला मुलागा आला आणि तावातावात म्हणत होता, ’भॆन्चोद खर सांगुया" त्यावर दुसरा म्हणाला बोलुन टाक. त्यानंतर अचानक ५-६ अजुन मंड्ळी आली. लांबुनच शिव्या घालत येत होते त्यामुळे हे त्यांचे मित्र एवढ तरी पक्क होत. त्यांच बोलण सुरु झाल. सर्व मित्र एकत्र येऊन त्यांच्यातल्याच एकाला समजवत होते. मॅटर मुलीचा होता एवढ तरी सिगरेट संपे पर्यंत कळल. निघायच होत पण पाय आणि मन दोघ आता एकत्र झाले होते, मी उगाचच त्यांना ऑकवर्ड वाटायला नको म्ह्णुन दुसरी सिगारेट पेटवली. त्यांच्या बरोबर काढलेल्या त्या १५ मिनिटांमध्ये मी माझ्या आयुष्याची ५ वर्ष पाहिली. पहिल्या प्रेमापासुन ते ब्रेक ऑफ़ पर्यंत प्रत्येक साथ देणारे आणि माझ्याच अंथरुणात येऊन मला हळुच लादीवर ढकलण्या पर्यंत सर्व गोष्टी, आणि या सर्वा गोष्टींचे कारणी भुत माझॆ मित्र सर्वांना मी त्या तिथे , त्या टपरीवर पाहिले. कॉलेजच्या आत जे शिक्षण मिळाल त्या पेक्षा बाहेर बसुन मिळवलेल्या ज्ञानाची कदरच जास्त वाटते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment