माझ मन फ़ार उतावळ असत प्रत्येक गोष्टी साठी. मी या जगात का आलो, काय, करतोय, काय करेन कशाचीच माहिती नाहीये.पण कधीतरी अस वाटत जस जगतोय तसच जगाव यापेक्षा चांगल म्हणजे नक्की काय! चांगल होण्यासाठी कोणती किंमत मोजावी लागेल. लहानपणी वाटत होत लवकर लवकर मोठ व्हाव आता वाटतय ते दिवस, त्या आठवणी किती सुंदर होत ते जग, सकाळी उठा, डॊळे चोळा आजुबाजुला बघा अरे! गिशु अजौन झोपलीय दरवाज्याच्या बाहेरुन शेजार-यांचा आवाज येतोय. दरवाजा उघडायचा तर बाहेर सगळॆ शेजारचे मित्र शाळेची लाल चड्डी आणि पांढरा शर्ट घालुन तयार! शाळा???? वैताग येणार आहे पण जगाचा नियमच आहे म्हणुन जायच नाहीतरी मित्र सोडले तर मला शाळेत दुसरी कोणतीच गोष्ट आवडली नाही. पण जायला तर पाहीजे, उशिर झाला म्हणुन अतुलची आई ऒरडेल, मी तयारी केली गिशुला जाताना दरवाजा घट्ट लावुन घ्यायला सांगितला, दहा मिनिटाच्या अंतरावर शाळा अजुन सकाळची शाळा सुटली नाही. अरे!आज सोमवार तो सुध्दा श्रावणातला, म्हणजे शाळॆत प्रसादीसाठी चणे घेउन जायला पाहिजेत.आईला लक्षात असेलना की तिची शाळा सुट्ल्यावर ती चणे न घेऊन येता परस्पर घरी निघुन जाईल.च्यायला आज पण भुगोलाचा ग्रुहपाठ नाही केला. बाई मारतील, चालेल पण बाहेर नको उभ करायला टाइमपास करायला काहीच नाही........आज मी २१ वर्षांचा आहे प्ण मला हे कळत नाही की मी माझी महत्वाची काम करायला कसा विसरतो.
Chaan lihalay. Aankhi athavani lihi shala pustakatalya sarkhya.. Good one
ReplyDelete